HW News Marathi
महाराष्ट्र

पालघर, ठाण्यासह मुंबईतील सर्व शाळा-कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर

मुंबई । पालघर, ठाण्यासह मुंबई आणि उपनगरांत शुक्रवारपासून (२ ऑगस्ट) बरसणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणे प्रभावित झाली आहेत. त्याचप्रमाणे, हवामान खात्याकडून येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी (५ ऑगस्ट) पालघर, ठाणे, रायगडसह मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी उद्या (५ ऑगस्ट) आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशीही माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं – चंद्रकांत पाटील

News Desk

उद्धव ठाकरेंचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

News Desk

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

News Desk