HW News Marathi
महाराष्ट्र

खडवलीमध्ये अडकलेल्या २५ जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप सुटका

मुंबई । राज्यभरात सध्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर ज्यन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे

खडवलीजवळील नांगखुरी गावातील ३५ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. या सर्व जणांना वाचविण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. या ३५ जणांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने कोलशेत येथे आणण्यात आले आहे.

राज्यभरात अतिवुष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी एनडीआरएफला सतर्क राहण्याचे निर्देश दिले. तसेच खडवली येथील पुरात अडकलेल्या ३५ ग्रामस्थांची हेलीकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाला केली होती.

त्याचप्रमाणे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागांत कळंबोली,जुपाडा, वांद्रे, सोर, आतकोली भादाणे, डोहळे आदिवासी वाडी परिसरात पुरसदृश्य परिस्थिती कायम असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. या तालुक्यातील भातसा नदीवरील सर्वच पूल पाण्याखाली गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड : लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांकडून सूचना

swarit

NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटलांची माहिती!

News Desk

“महाविकास आघाडी सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर” चंद्रकांत पाटलांची जहरी टीका!

News Desk