HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूर पोटनिवडणूक: भाजपकडून समाधान अवताडेंना उमेदवारी,आज अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची फौज येणार

पंढरपूर | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आज (३० मार्च) उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांची फौज पंढरपूरमध्ये सकाळी येणार आहे. कोरोना असतानाही नेत्यांच्या गर्दीत अवताडे यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे यावरून दिसत आहे. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह आमदार विनायक मेटे, गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, खासदार रणजित निंबाळकर व खासदार जय सिद्धेश्वर स्वामी उपस्थित राहणार आहेत.

आज सकाळ ही उमेदवारी दाखल होण्याची शक्यता असून जेथे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता, त्याच श्रीयश पॅलेसमध्ये भाजप नेते 200 प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाचे नियम पळत सोशल डिस्टन्स पळाले जाणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची निवडणुक १७ एप्रिलला होणार आहे.त्यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे की , आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा !

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

News Desk

आपल्याला शिवसेना प्रमुखांना १०० आमदारांची तोफरुपी सलामी द्यायची आहे !

News Desk

लेख लिहिल्याप्रकरणी सनदी अधिकारी देवरा यांना खुलासा करण्याचे आदेश

News Desk