HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला – पंकजा मुंडे

मुंबई । राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा रद्द करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे, या निर्णयाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परिक्षा येत्या १४ मार्चला घेण्यात येणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत सरकारने ही परिक्षा अचानक रद्द केली, यापूर्वी देखील परिक्षा स्थगित करण्यात आली होती. सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

‘एमपीएससीचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थ्यी हे ग्रामीण भागातील आहेत, अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत पुणे किंवा अन्य शहरात राहून करिअर घडविण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करतात. कोरोनाचे नियम पाळून इतर सर्व व्यवहार चालू आहेत मग परिक्षा का नको? असा सवाल त्यांनी केला. परिक्षा रद्द केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वय निघून जातील, त्यांची मेहनत व्यर्थ जाईल तसेच त्यांचे भविष्य देखील अंधःकारमय होईल. सरकारच्या या निर्णयाने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, त्यांना न्याय द्यावा असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातुर-बर्दापूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाची डॉ.प्रीतम मुंडेनी केली पाहणी

Aprna

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार

News Desk

सांगलीत गॅगवारमधून शकील मकानदारची हत्या 13 जणांनी केला हल्ला

News Desk