HW News Marathi
महाराष्ट्र

“ओबीसी समाजाला ६ जुलैला न्याय मिळणार”- पंकजा मुंडे

बीड । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा पुनर्विचार फेटाळून लावल्यावर राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण पुढे ढकल्यामुळे परत एकदा वादाला सुरुवात झाली आहे .यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारने व्यवस्थित बाजू मांडली असेल तर येत्या 6 जुलै रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळेल, अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये

केंद्र सरकारने मराठा आरक्षणप्रकरणी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 6 जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. तसेच सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली नाही, असं त्या म्हणाल्या. बीडमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

आरोग्य सेवकांचा सन्मान करण्यात आला

पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर आहेत. त्या बीड येथील एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी कोरोनाच्या संकट काळात सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना कार्डचे वाटप केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सर्वप्रथम पंकजा मुंडे यांचा क्रेनच्या सहाय्यानें तब्बल 251 किलोच्या पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. तर 150 किलो फुले उधळण्यात आली. पंकजा मुंडे आणि गर्दी हे बीड जिल्ह्याचे समीकरण आहे. आज पंकजा मुंडेंची क्रेज पुन्हा एकदा पहावयास मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत,अजित पवारांचा निलेश राणेंना सणसणीत टोला!

News Desk

“राज्यातील रक्त पुरवठा वाढविण्यासाठी मी स्वतः रक्तदान करणार”,सुप्रिया सुळेंचा निर्णय

News Desk

राज्य सरकारला दुष्काळाच्या माहितीसाठी अजून किती वेळ हवा? , न्यायालयाचे ताशेरे

News Desk