HW News Marathi
महाराष्ट्र

पुरे झालं ऑनलाईन शिक्षण… महाराष्ट्रातील ८१.१८ % पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्ष शाळा बंद होत्या. शाळकरी मुलांना रोगाचा त्रास होऊ नये म्हणून सरकार ने निर्णय घेतला होता. अद्याप कोरोनाचं संकट काही गेलेलं नाही आणि त्यामुळे शाळा अजूनही बंद आहेत. राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणामधून करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी केली असल्याचं दिसून आलं आहे. ८१.१८ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास आम्ही तयार आहोत असं मत व्यक्त केलं आहे.

पालकांची शाळा सुरु करण्याची मागणी

ऑनलाईन शिक्षण हे अद्याप सुरु असून आता पालक आणि विद्यार्थी त्याला कंटाळले आहेत असं दिसून येतंय. महाराष्ट्रामधील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६ लाख ९० हजार ८२० पालकांपैकी ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील, ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आणि ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागात राहाणारे आहेत.

सर्वेक्षणात जास्तीत जास्त पालकांचा समावेश

सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी सर्वाधिक म्हणजे ७३ हजार ८३८ पालक हे पुण्यातील होते. तसेच मुंबई मनपा क्षेत्रातील ७० हजार ८४२ पालकांनी आपला प्रतिसाद यामध्ये नोंदवला. त्याप्रमाणे कोल्हापूरमधील ३० हजारहून अधिक, नाशिकमधील ४७ हजारांहून अधिक, साताऱ्यातील ४१ हजारांहून अधिक, ठाण्यातील ३९ हजारांहून अधिक पालकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.

सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी २.८९ टक्के पालकांची मुलं ही नर्सरीमध्ये आहेत. तर पहिली ते पाचवीला पाल्य असणाऱ्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांची संख्या २३.४८ टक्के इतकी आहे. सहावी ते आठवीला पाल्य असणाऱ्या ३१.२१ टक्के पालकांनी या सर्वेक्षणात मत नोंदवलं. सर्वाधिक ४१.५४ टक्के पालक हे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे होते. तसेच ११ वी आणि १२ वीला पाल्य असणाऱ्या पालकांची १५.२६ टक्के इतकी होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड शहरात आता दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी “नो-व्हेईकल डे” 

News Desk

मुखेडमध्ये खिचडी खाल्याने 29 विद्यार्थ्यांना विषबाधा

News Desk

भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

News Desk