HW News Marathi
देश / विदेश

पार्थ पवार नाराज नाहीत, जयंत पाटलांचा दावा 

मुंबई | “पार्थ पवार नाराज आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले ? शरद पवारांना पार्थचे आजोबा म्हणून काही बोलण्याचे, सुचविण्याचे सर्वाधिकार आहेतच”, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पार्थ पवारांबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काल (१२ ऑगस्ट) फटकारल्यानंतर पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, अजित पवार आणि पार्थ पवार यांपैकी कोणीही नाराज नसल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे. जयंत पाटील आज (१३ ऑगस्ट) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“पार्थ पवार नाराज आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले ? मुळात ते नाराज का असतील ? पार्थच्या आजोबांना त्यांना काही बोलण्याचे, सुचविण्याचे सर्वाधिकार आहेत. कुटुंबातले वडीलधारे जर काही बोलले तर आपण नाराज होतो का? पार्थना त्यावेळी जी भूमिका योग्य वाटली ती त्यांनी घेतली. त्यामागे काही विशेष हेतू आहे असं मला वाटत नाही”, असे जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्याचप्रमाणे, “अजित पवारही नाराज नसून पवार कुटुंबात कोणताही वाद नाही”, असेही यापूर्वी जयंत पाटलांनी सांगितले होते. अजित पवारांनी काल थेट सिल्व्हर ओक गाठत शरद पवारांची भेट घेतली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेलंगणानंतर तामिळनाडूनेही १० वी ११ वीच्या मुलांना पास करायचा घेतला निर्णय

News Desk

मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी झाली, मात्र ‘ही’ आहे अडचण

News Desk

जगातील १०० टॉप ब्रॅण्ड्समध्ये टाटा समूह ठरला एकमेव भारतीय ब्रँड

News Desk