HW News Marathi
महाराष्ट्र

काल देशभरात एप्रिल फूलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस केला साजरा

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ‘आम्ही आई अंबाबाईचा रथ ओढला आणि तिला साकडे घातले की, राज्यात जे सरकार बसले आहे. ते भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो’, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राज्य सरकारवरटीका केली आहे.

‘काल देशभरात एप्रिल फूलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचे सरकार आल्यापासून देशातील जनतेचा एप्रिल फूल होत आहे.’ धनंजय मुंडे यांनी अशा शब्दात मोदींवर ट्विटरवरुन टीका केली आहे. महागाई, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ही हल्लाबोल आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड तालुक्या येथे चौथ्या हल्लाबोल आंदोलनातील पहिल्या भाषणात मोदी आणि राज्य सरकारवर धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC मधील प्रभाग रचनेतील बदललेल्या नकाशाबाबत भाजप नेत्याचा आक्षेप

Aprna

“शरद पवारांना घरातलेही गांभीर्याने घेत नसावेत,” अतुल भातखळकरांचा खोचक टोला

News Desk

‘विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध’, राज्यपालांचं आश्वासन

News Desk