HW News Marathi
Covid-19

लोकांनी लॉकडाऊनची मानसिकता ठेवा!,  आरोग्यमंत्र्याचा गंभीर इशारा

मुंबई | राज्यात वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता लॉकडाऊनची वेळ आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्यानंतर त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरुच आहे. दरम्यान ,राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिले आहेत. तसेच, जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवा असा गंभीर इशाराही दिला आहे. आज (१२ एप्रिल) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे ते असं देखील म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगितल्या. लोकांचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी केलं असेल त्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. पण सध्या लसीकरणावर फोकस करणे जास्त गरजेचे आहे”.

लॉकडाऊन बाबत टोपे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत लोकांना आधी कल्पना देऊनच हा निर्णय घेतला जाईल. मात्र, लोकांनी मानसिकता ठेवायला हवी. या सगळ्याची पूर्वसूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील. त्यामुळे मानसिकता ठेवा असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी जनतेला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे आरोग्यमंत्री ऑक्सिजन सपोर्टवर, फुफ्फुसात कोरोना संसर्ग वाढल्याची माहिती

News Desk

स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान म्हणाले, “देश म्हणून पुन्हा उभा राहण्याची वेळ आली आहे”

News Desk

पुण्यातील कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये १० ते १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा !

News Desk