HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातलं सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, पंढरपूरात फडणवीसांनी उडवला राजकीय धुरळा !

पंढरपूर | महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेली पंढरपूर-मंगळवेढा निवडणुक आता अगदी तोंडावर आलेली आहे. जयंत पाटील,देवेंद्र फडणवीस सगळ्यांनी या निवडणुकीसाठी

कंबर कसलीये.आज फडणवीस एका दिवसात सहा सभांचा धुरळा उडवत आहेत. एका भाषणात बोलताना महाराष्ट्रातलं सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा ,असे म्हणत त्यांनी राजकीय धुरळा उडवुन दिला आहे.

फडणवीस म्हणालो,लोक म्हणतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

कोरोना काळातील अपयशाचं खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. तसेच, ‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जयंत पाटलांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तृळात जोरदार रंगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच, आकडा ११७ वर

News Desk

‘अंडे आणि कोंबडी’ला शाकाहारीचा दर्जा द्या | संजय राऊत

News Desk

“प्रत्येक क्षणी…”; पंतप्रधान मोदींच्या विमानातील ‘त्या’ फोटोवर पंकजा मुंडेंची कमेंट

News Desk