HW News Marathi
महाराष्ट्र

केरळमधील नागरीकांना पुण्यातून जाणार पिण्याचे पाणी

पुणे | केरळमध्ये ८ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसामुळे महापूरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या या पुरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून शनिवारी सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवले जाणार आहे. तसेच रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना केले जाणार आहे.

रतलाम येथूनही १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे २९ वॅगन दुपारी १ वाजता पुण्यात दाखल झाल्यानंतर एकूण ४३ वॅगनमध्ये २१ लाख ५० हजार लिटर पाणी घेऊन ही विशेष रेल्वे दुपारी २ वाजता केरळकडे रवाना होईल. केरळ मधील कयनकुलम जंक्शनवर हे पाणी पोहचवले जाईल. पुण्यातील रेल्वे च्या अधिकारी व कर्मचा-यांकडून काल रात्रीपासून यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार मुहूर्ताची वाट का बघत आहे ?

Gauri Tilekar

पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यासह विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या १६ पुलांना मुख्यमंत्र्यांची मान्यता

Aprna

ट्रक व जीपचा भीषण अपघात; 6 प्रवासी जागीच ठार; अंबाजोगाईजवळील घटना

News Desk
देश / विदेश

केरळच्या पुरग्रस्त परिस्थितीची पंतप्रधानांनी केली पहाणी, केरळला ५०० कोटींची मदत जाहीर

News Desk

तिरुवनंतपुरम | केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.

त्यापुर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळला पुराचा फटका बसल्यामुळे ५०० कोटीं रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

 

Related posts

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात

News Desk

कांदा निर्यातबंदीने देशाच्या प्रतिमेला धक्का बसेल- शरद पवार  

News Desk

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी! –  नाना पटोले

Aprna