HW News Marathi
महाराष्ट्र

ट्रक व जीपचा भीषण अपघात; 6 प्रवासी जागीच ठार; अंबाजोगाईजवळील घटना

बीड | सुसाट गाडी चालवण्याच्या नादात बऱ्याचदा अपघात होण्याची शक्यता असते. तसेच अनेक जण यामध्ये आपला जीव गमावतात. अशीच एक घटना घडली आहे ती बीड जिल्ह्यात. भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघाता झाला आहे. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ आज (शनिवार, २३ एप्रिल) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्वी (ता.लातूर) येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने (क्र. एम.एच.२४ व्ही ८०६१) जात होते. सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्र.आर.जे. ११ जी.ए.९२१०) जोराची धडक दिली. यात पाच महिला व एक बालक जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह व जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil HW Exclusive : …म्हणून शरद पवार अस्वस्थ आहेत !

News Desk

भाजपमध्ये प्रवेश करणा-या १० आमदारांना शहांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

News Desk

‘शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात’, किशोरी पेडणेकरांचे राणेंवर टीकास्त्र!

News Desk