HW News Marathi
महाराष्ट्र

प्लास्टिक बंदीमुळे खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राभरात चर्चेत असलेली प्लास्टिक बंदी अखेर सत्यात उतरताना दिसून येत आहे. २३ जून पासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी महापालिकांनी लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई व्यापारी व विक्रेत्यांवर केल्याचे पहायला मिळाले.

प्लास्टिक बंदीच्या दुस-याच दिवशी रविवार असल्यामुळे नॉनव्हेज खाणा-या खवय्यांची मात्र चांगलीच शक्कल लढविल्याचे दिसून आले. मटण, चिकन, मासे कशातून आणायचे ? असा प्रश्न नागरीकांना पडला होता. पण यावर ग्राहकांनीच उपाय शोधला असून आज मुंबईभर लागलेल्या रांगांमध्ये स्टीलचे डबे घेऊन ग्राहकांनी खरेदी केली. आज काही ग्राहकांनी डब्यांमधून मटण, चिकन आणि मासे आजच्या मेजवानीसाठी नेले.

परंतु, प्लास्टिक बंदी ही पर्यावरणासाठी पोषक असली तरी त्याचा व्यवसायावर परीणाम झाला असल्याचेही अनेक चिकन, मटन, मासे विक्रेत्यांनी सांगितले. दर रविवार प्रमाणे आज गर्दी नाही तर प्लास्टिक बंदी नंतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरविल्याचेही अनेक ठिकाणी पहायला मिळाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना, नुकसानीची करणार पाहणी

News Desk

भांडूप आग प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी मागितली मृतांच्या कुटुंबीयांची माफी, कुटुंबीयांना ५ लाखाची मदत जाहीर

News Desk

“नितेश राणेंच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही” – अनिल परब

News Desk
देश / विदेश

पंतप्रधान मंगळवारी मुंबईत

swarit

मुंबई | पायाभूत गुंतवणुकीवरील बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जून रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी मुंबई भाजपाने २६ जून रोजी विचारमंथन आयोजित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख संवादक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल.

आर्थिक कामकाज विभाग, अर्थ मंत्रालय, हिंदुस्थान सरकार आणि आशिया इफ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) यांच्यातर्फे मुंबईत २५ आणि २६ जूनला आशिया इफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी)ची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. बैठकीत ‘पायाभूत सुविधांसाठी अर्थनिधी : नावीन्य आणि सहकार्य’ या विषयावर मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. २६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल, अर्थसचिव सुभाषचंद्र गोयल उपस्थित राहणार आहेत.

Related posts

पाकिस्तानमध्ये दिसणार भारतीय मालिका, चित्रपट

News Desk

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

News Desk

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

swarit