HW News Marathi
महाराष्ट्र

प्लास्टिक बंदीमुळे खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राभरात चर्चेत असलेली प्लास्टिक बंदी अखेर सत्यात उतरताना दिसून येत आहे. २३ जून पासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी महापालिकांनी लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई व्यापारी व विक्रेत्यांवर केल्याचे पहायला मिळाले.

प्लास्टिक बंदीच्या दुस-याच दिवशी रविवार असल्यामुळे नॉनव्हेज खाणा-या खवय्यांची मात्र चांगलीच शक्कल लढविल्याचे दिसून आले. मटण, चिकन, मासे कशातून आणायचे ? असा प्रश्न नागरीकांना पडला होता. पण यावर ग्राहकांनीच उपाय शोधला असून आज मुंबईभर लागलेल्या रांगांमध्ये स्टीलचे डबे घेऊन ग्राहकांनी खरेदी केली. आज काही ग्राहकांनी डब्यांमधून मटण, चिकन आणि मासे आजच्या मेजवानीसाठी नेले.

परंतु, प्लास्टिक बंदी ही पर्यावरणासाठी पोषक असली तरी त्याचा व्यवसायावर परीणाम झाला असल्याचेही अनेक चिकन, मटन, मासे विक्रेत्यांनी सांगितले. दर रविवार प्रमाणे आज गर्दी नाही तर प्लास्टिक बंदी नंतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरविल्याचेही अनेक ठिकाणी पहायला मिळाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

News Desk

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात; आज मध्यरात्रीपासून निर्बंध शिथिल

News Desk

संदीप देशापंडेंनी ‘या’ घटनेवर दिले स्पष्टीकरण

Aprna