HW News Marathi
महाराष्ट्र

Poladpur Bus Accident | मृतांच्या नातेवाईकांकडून सावंत-देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी

दापोली | आंबेनळी घाटातील बस अपघातात बचावलेले एकमेव कर्मचारी प्रकाश सावंत-देसाई यांच्याबाबत इतर मृतांच्या नातेवाईकांच्या मनात संशय आहे. प्रकाश सावंत-देसाई यांच्यासंदर्भात कोणतीच कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा मृतांच्या नातेवाईकांकडून वारंवार केली जात आहे. प्रकाश सावंत- देसाई यांना अधिकाऱ्यांकडून पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोपही नातेवाईकांकडून केला जात आहे. तसेच प्रकाश सावंत-देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील मृतांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी ते कृषी विद्यापीठात आले होते.

दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचा-यांची सहलीची बस २८ जुलैला आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळली होती. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून केवळ प्रकाश सावंत-देसाई हेच बचावले. मात्र यामुळेच आता मृतांच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. इतक्या जणांपैकी केवळ तेच बसच्या बाहेर कसे फेकले गेले. तसेच त्यांनी माध्यमे आणि पोलिसांना वेगवेगळी उत्तरे का दिली, असे अनेक प्रश्न मृतांच्या नातेवाईकांकडून विचारले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहरालगतच्या गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरु करा! – सुनिल केदार

Aprna

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावी – राजू शेट्टी

News Desk

अनिल परबांचा राजीनामा का नाही?, नितेश राणेंचा सवाल!

News Desk