HW News Marathi
महाराष्ट्र

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू

सातारा |महाबळेश्वरला शनिवारी सकाळी सहलीसाठी जात असलेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचा-यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सुदैवाने या अपघातातून १ जण बचावले आहे. बचावलेले सहाय्यक अधीक्षक प्रकाश सावंत – देसाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या घटनास्थळावर मदत करण्यासाठी पोलादपूर पोलीस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते. दरम्यान, ही बस कृषी विद्यापीठाची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आतापर्यंत दरीत कोसळलेल्यांचे ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. रेस्क्यू ऑपरेशन मध्ये कधी ट्रेकर्स जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले…

News Desk

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यात मंदिरे सुरू होणार!

News Desk

शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू कोयत्याने पुसणारी आमची अवलाद नाही | पंकजा मुंडे

News Desk