HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू कोयत्याने पुसणारी आमची अवलाद नाही | पंकजा मुंडे

बीड | भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याच्या निमित्ताने आज (२४ ऑक्टोबर) अंबाजोगाईत सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, “शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले पाणी मी बघू शकत नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू कोयत्याने पुसणारी आमची अवलाद नाही.” त्यापुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणल्या की, “ऊसतोड कामगारांचा प्रश्न खूप दिवसापासून रखडला आहे. कोणीही उठसुठ म्हणत आहे की, आम्हाला लवाद मान्य नाही आणि पंकजा मुंडे एकट्याच हा निर्णय घेणार का ?”

“अरे लवाद नको म्हणजे पंकजा मुंडे नको आहे”, असे म्हणत विरोधकांवर टोला लगावला पंकजा मुंडे यापुढे म्हणाल्या की, “आज अष्टमी आहे आणि मी आज निर्णय घेते की संबंध महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना आव्हान करते. शरद पवारांना जाहीर विनंती करते की,तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी २१ रुपयांनी वाढ करून द्या. भगवानबाबाचे दर्शन घेऊन दसऱ्यापासून ऊस तोडण्यास लागा कामाला”, असा निर्णय देत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या शैलेश जोशींची आत्महत्या

News Desk

‘तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे!’ पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

News Desk

बेकायदा गर्भपात प्रकरणी रुग्णालयाचा परवाना रद्द

swarit