HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आंदोलनात पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबदा | मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलना दरम्यान पोलिसांवर जमाव चालून आल्याने पळताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबदमध्ये एकच खळबळ माजली आहे.

या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव लक्ष्मण पाटगावकर असे आहे. पाटगावकर यांना जवळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर पळत असताना अजून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

औरंगाबादच्या कोयगावमध्ये आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. हिंसा किंवा जाळपोळ करुन नका, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लाऊड स्पिकरवर सांगत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षण रद्द, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk

मुलांनी आईची केली हत्या ?

News Desk

सर्व क्षेत्रांच्या समृद्धीसाठी विकासाच्या रोडमॅपद्वारे कामे सुरू! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna
राजकारण

राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

News Desk

नवी दिल्ली | महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे पहायला मिळत आहे. मराठा आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा मुद्दा राज्यसभेत मंगळवारी उपस्थित केला.

छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. मराठा समाजाचा त्यात समावेश होता. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे भावना तीव्र झाल्या आहेत, असेही संभाजीराजे यावेळी राज्यसभेत बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला बोलवावे आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला न येऊ देण्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी भाष्य केले. यातून काय मेसेज जातो याचा विचार करावा, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आजपासून संवाद दौरा सुरू

News Desk

…तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणारच नाही !

News Desk

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

Aprna