HW News Marathi
राजकारण

राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

नवी दिल्ली | महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे पहायला मिळत आहे. मराठा आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा मुद्दा राज्यसभेत मंगळवारी उपस्थित केला.

छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. मराठा समाजाचा त्यात समावेश होता. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे भावना तीव्र झाल्या आहेत, असेही संभाजीराजे यावेळी राज्यसभेत बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला बोलवावे आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला न येऊ देण्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी भाष्य केले. यातून काय मेसेज जातो याचा विचार करावा, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द

News Desk

शरद पवार हे भाजपच्या ट्रॅकमध्ये अडकले आहेत !

News Desk

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

News Desk