HW News Marathi
महाराष्ट्र

मातोश्रीबाहेरून ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याला अखेर पोलिसांनी सोडले

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्री त्यांना भेटण्यासाठी आलेला शेतकरी आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या शेतकऱ्याचे नाव देशमुख असून ते पनवेलमधील रहिवासी आहे. बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी त्याची व्यथा मांडण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र, या शेतकऱ्यांना मातोश्रीबाहेरील पोलिसांनी गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. याला शेतकऱ्याने विरोध केल्यानंतर पोलिसांनी मुलीसह शेतकऱ्याला ताब्यात घेतले. संबंधित शेतकऱ्याला चौकशीसाठी खैरवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यांचा जबाब नोंदवून सोडले आहे.

दरम्यान, यावेळी देशमुख आणि त्यांच्या मुलीला थोडी धक्काबुक्कीही झाली. मातोश्रीबाहेर दिवसभरातून अनेकजण येतात. त्यामुळे अशा प्रकारावर पोलीस आणि शिवसेनेवर विरोधकांनी टीका केली आहे. “मातोश्रीबाहेरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होतोच आहे. पण अवघ्या 8 वर्षांच्या लहान मुलीला ‘मातोश्री’बाहेर अशी वागणूक मिळत असेल, तर राज्यातील जनतेने अपेक्षा करायची तरी कुणाकडून? मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी,” असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी ब्रिगेड कडून थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्यासमोर ठिय्या…!

News Desk

किरीट सोमय्यांचा यादीत ‘ती’ ११ नावे दाखल !

News Desk

‘हिंदू महिला, मुलींना जबरदस्तीने हिजाब घालायला लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा’ – प्रविण दरेकर

News Desk