HW News Marathi
महाराष्ट्र

तब्बल 20 दिवसानंतर सीरियल किलरला घेतले बीड पोलिसांनी ताब्यात

बीड | बीड जिल्ह्यातील शिरूर कासार परिसरात आनंद गाव परिसरातील ६ मे रोजी एका ६५ वर्षे वृद्धांचा निर्घृण हात्या करण्यात आली होता. तर एकास जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. खून झाल्याच्या ठिकाणी एक चिट्टी लिहिलेली पोलिसांना मिळाली आणि या चिठ्ठीत काही लोकांची नावे देखील लिहिण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि या घटनेमुळे संबंध जिल्हा हादरून गेला होता. तर बीड पोलिसांना सुद्धा चिठ्ठीतून चॅलेंज करण्यात आले होते ६ तारखेला धीरूर कासार हद्दीतील दोन्ही ठिकाणी झालेल्या घटनेमुळे पोलिसांच्या काही टीम जिल्ह्यात तर काही टीम जिल्ह्याच्या बाहेर गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी गेल्या असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदतून दिली .

दरम्यान आरोपीला बीड पोलिसांनी वर्ध्यातून अटक करून ताब्यात घेतले आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता तो पत्नीच्या जाचास कंटाळून त्याने त्याच्या मेहुण्याला गोवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला असल्याचे समोर आले असलचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीची पत्नी ही त्याच्यासोबत राहत नसल्यामुळे घरगुती वादातून त्याने मेहुण्याला गोवण्याच्या उद्देशाने त्याने या हत्या केल्या आणि दिशाभूल करून चिट्या लिहून ठेवल्या आणि त्यामध्ये त्याने त्याच्या ५ ही मेहुण्याच्या नावाने लिहून ठेवल्याने बीडचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

या आरोपीचे अंदाजे वय ३० वर्षा असून तो निरक्षर असल्याचे पोलिसानी संगीलते आहे तर आरोपी हा ऊसतोड कामगार असल्याचा केला खुलासा या खुण्याचा शेध घेण्यामध्ये पोलिसांना अंदाजे २० लोकांची चौकशी केली मात्र तो आरोपी अखेर तब्बल २० दिवसानंतर संसयात सापडला असल्याचेही पोलिसांनी संगीतले तर पुढील तपास सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषद आयोजित करून सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप व फडणवीस सरकारच! – नाना पटोले

News Desk

सार्वजनिक निवडणूकीत देखील ६० टक्केपेक्षा जास्त मतदान होत नाही

News Desk

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस छेडणार आंदोलन

News Desk