HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय दंगलीमुळे देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल!, राऊतांचे भाकीत

मुंबई | “राजकीय दंगलीमुळे देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल,” असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. राऊतांनी आज (१९ एप्रिल) देशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप दंगलीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी माध्यमांशी बोलताना लावला आहे. “यापूर्वी देशातील लोकांनी रामनवमी आणि हनुमान जयंती शांतपणे साजरी करत होतो होते. दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीची कायदा सुव्यवस्था केंद्राच्या हाता आहेत,” असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. 

राऊत म्हणाले, “देशाच्या दोन प्रमुख शहरात ज्या पद्धतीने दंगलीचे वातावरण निर्माण केले जात आहे किंवा बनवले जात आहेत. आणि खासकरून सत्ताधारी पक्षाकडून होणे हे खूप दुर्दैवी गोष्टी आहे. देशाच्या राजधानीत दंगे होत आहेत. ही पहिलीच वेळ नाही. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहेत. दिल्लीत फक्त नगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत. पहिल्यात दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही पहिल्यांदा पुढे ढकल्यात आणि आता दंगल करवत आहात. हे जे काही सर्व सुरू आहे. हे दिल्ली महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी करत आहात. निवडणुका जिंकण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कोणताही विषय नाही. तसेच दिल्लीप्रमाणे मुंबईत देखील तुम्ही तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. मुंबईत तुमची ताकद नाही म्हणून तुम्ही कोणाला तरी पकडून तणाव निर्माण करण्याचे काम दिले आहे. आणि मग भोंग्याचा मुद्दा उचला गेला आहे. देशातील अजून मोठ मोठ्या शहरात अशात प्रकारचा तणाव निर्माण कराल तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जी कोव्हिड काळात पहिलीच उद्धवस्त झाली आहे. लोक आता कुठे कोव्हिडमधून बाहेर पडत असून त्यांना आता कुठे रोजगार मिळत आहेत. लोक आता नोकरीला जाऊ लागले, व्यापारी आणि उद्योगपती काम सुरू झाले आहेत. यात आता तुम्ही राजकीय स्वर्थासाठी दंगलीचे राजकारण करणार तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षा खाली जाईल.”

देशातेल दंगे भाजप प्रयोजीत, राऊतांचा आरोप 

देशभरामध्ये जे दंग सुरू आहेत. देशातील सत्ताधारी पक्ष जो आहे. देशातेल दंगे भाजप प्रयोजीत आहे. याआधी रामनवमी आणि हनुमान जयंतीला दंगे झाले नाहीत. लोकांनी हे सण शांतपणे साजरे केले आहेत. दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीची कायदा सुव्यवस्था केंद्राच्या हाता आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिकडे दंगे सुरू आहेत. कारण दिल्ली महानगरपालिकांच्या निवडणुकांवर जिंकण्यावर भाजपचे लक्ष आहे. कोव्हिडच्या संकटातून देश आता कुठे सावरत आहे. लोक आता कुठे काम धंद्याला जावू लागले आहेत. आता कुठे लोकांच्या चुली पेटू लागू लागल्या आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना परत तुम्ही दंगे निर्माण केलेत. यामुळे परदेशी गुंतवणुकीवर परिणाम होतो. या शहरांमध्ये देशातील उद्योगपती गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. मजूर वर्ग पळून जातो, असे अनेक प्रश्न या दंग्यांमुळे निर्माण झाले आहेत. आणि त्याला भाजप जबाबदार आहे. त्यांना या देशाची आणि कोट्यावधी लोक, कष्टकरी आणि शेतकऱ्यांशी काही पडली नाही. त्यांना फक्त दंगेच्या माध्यमातून राजकारण करायचे हे या देशाचे दुर्दैव आहे.   

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ! – एकनाथ शिंदे

Aprna

अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा!

News Desk

गुलाबराव पाटील यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna