HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची बैठक, भोंग्यासंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता?

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भोंग्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृह विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची आणि पोलीस महासंचालक यांची बैठक आज(१८ एप्रिल) दुपारी १२ वाजात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था काम रहावा, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

येत्या ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवा, अशा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे आता नाशिक पोलीस आयुक्तांनी आता धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकर लावण्याआधी परवागी घ्यावी लागणार असून मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा पठणास नाशिक पोलीस आयुक्तांनी मनाई केली आहे. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

३ मेपर्यंत मिशदीवरील भोंगे हटवण्याचा राज ठाकरेंचा इशारा

 राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवले नाही. तर त्या भोंग्यासमोर आम्ही हनुमान चालीसा लावू, असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. पुण्यात काल (१७ एप्रिल)  झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी म्हणाले,”देशातील सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर मला वाटते की लाऊडस्पिकर वाटत असेल, तर त्यांना जशास तसे उत्त देण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा, माणुसकी म्हणून मुस्लिम धर्मियांनी विचार करावा, प्रार्थनेला विरोध नाही. १ मे रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आणि जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकार दाऊदची गँग चालवताय का’? आशिष शेलारांचा सवाल

News Desk

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १०वी-१२वी परीक्षेदरम्यान वर्गात कमीत कमी विद्यार्थी बसवण्याचा निर्णय

swarit

ST संपावर पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार

Aprna