HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये राजकीय वातावरण तापले, शिवसंग्रामचे १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

बीड | बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.

बीड मतदारसंघात शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता.

बीड नगरपालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोरच राष्ट्रवादीला धक्का बसल्याने संदीप क्षीरसागरांनी आता शिवसंग्रामच्या नेते- कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आ. विनायक मेटे यांना मोठा झटका दिला आहे. पेठ बीड परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्त्यांना जाहीर प्रवेश देऊन रिकामी झालेली पोकळी भरून काढली आहे.

गेल्या वर्षभरात शिवसंग्रामला मोठी गळती लागली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर नसल्याची नाराजी पक्षात उघड झाली आहे. आ. विनायक मेटे आणि त्यांचे बंधू रामहरी मेटे यांच्याभोवतीच राजकारण फिरत असल्याने अनेक बढे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातील विनोद हातांगळे हे देखील आहेत. हातांगळे यांच्या शिवसंग्राम सोडण्याने पक्षाला याची भारी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते टिकवून ठेवणे हे मेटे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार

News Desk

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

News Desk

आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी केलं, बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये,निलेश राणेंचा प्रहार

News Desk