HW News Marathi
महाराष्ट्र

लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण, संजय राऊतांनी दिलं उत्तर

मुंबई | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल (६ फेब्रुवारी) निधन झाले. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण देश त्यांच्या निधनाने शोक व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र लतादीदींच्या नावाने राजकारण सुरू झाले आहे. लतादीदींवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी भाजपने केली आहे. तर त्यावर शिवसेनेनेही प्रतिक्रिया दिली आहे.

लतादीदी यांचे स्मारक उभारण्याची मागणी भाजप करत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राम कदमांनी म्हंटले की लतादीदींचे करोडो चाहते, संगीतप्रेमी आणि हितचिंतक यांच्या वतीने माझी नम्र विनंती आहे की, दिवंगत भारतरत्न लता दीदी यांचे शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या जागेवर स्मारक उभारण्यात यावे. तसेच या मागणीचा विचार करून तात्काळ स्मारक उभारायला हवे. कारण हे स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कदमांच्या मागणीवर शिवसेनेची प्रतिक्रिया

दरम्यान, राम कदम यांच्या या मागणीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “लताजींच्या स्मारकाबाबत पत्र लिहिणारे राजकारण करत आहेत. लताजींचे स्मारक उभारणे सोपे नाही. कारण ती स्वतःमध्ये एक अशी व्यक्तिमत्त्व होती. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी देशातील सरकारला विचार करावा लागणार आहे”, असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे !

News Desk

मुंबई उपनगरातील भूस्खलन होणाऱ्या धोकादायक ठिकाणी उपाययोजनांसाठी ६१ कोटींच्या खर्चास मंजुरी

News Desk

गणेश मंडळाचा उपक्रम; गणेशोत्सवात जन्मणाऱ्या मुलींना पाच हजारांची भेट

News Desk