HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांनी बैठकीत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केली चर्चा

मुंबई | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सलग एक तास चर्चा झाली. राजगृहावरील हल्ला, कोळी, भोईट समाजाच्या मागण्या, अनुसूचित जातींवर झालेले अन्याय अत्याचार अशा काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. त्याच्या तपासाबाबत चर्चा झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांकडून तपासाबाबत सुरु आहे. याबद्दल रोज उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणे होत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तसेच कोळी, भोईट या समाजाच्या मागण्यांबद्दल चर्चा झाली. बोगस सोसायटी बनवून मच्छीमारांना दिले जाणारे कॉन्ट्रॅक्ट चुकीचे आहे. हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यावर काही ठोस पावले उचलू आणि निर्णय घेऊ असे सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात अनुसूचित जातींवर अन्याय अत्याचार होत आहेत. त्यावरही प्रकाश आंबेडकर-मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. तसेच अनेक राजकीय विषयही या बैठकीत उपस्थित केले गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कसं काय शेलार बरं हाय का?”; अज्ञातांकडून थेट भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी

News Desk

मान्सूनची ७ जूनला महाराष्ट्रात हजेरी

News Desk

आता शरद पवार, संजय राऊत यांची तोंडं शिवली आहेत का? भाजपचा सवाल

News Desk