HW News Marathi
महाराष्ट्र

१० वी आणि १२ वीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होणार !

मुंबई | राज्यात कोरोनाचे संकट आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे १० वी आणि १२वीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. १०वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत, तर १२वीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. दहावी, बारावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. निकालाला विलंब झाल्यामुळे आता पुढील प्रवेशालादेखील उशीर होणार आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळाचा निकाल एकत्रित जाहीर केला जातो. यापैकी मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लहान माझी बाहुली तिची मोठी सावली”, पंकजा मुंडेंचे बहिणीच्या वाढदिवशी खास ट्विट

News Desk

आता नवा वसुली मंत्री कोण? – चित्रा वाघ

News Desk

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू; खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत नाही! – उपमुख्यमंत्री

Aprna