HW News Marathi
Covid-19

…तर चंद्रकांत पाटील अन् फडणवीसांनी इगतपुरीला जाऊन विपश्यना करावी !

मुंबई | “सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षे विरोधी पक्ष म्हणून प्रतीक्षा करावी. ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी”, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. राज्यात एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थिती बिकट असताना दुसरीकडे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये सतत शाब्दिक खटके उडत असताना आता प्रकाश आंबेडकरांनी देखील भाजपला हा टोला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असला तरीही यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला होता. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विनंती आहे कि, तुम्ही खुदा होऊ नका. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याकडे आता सरकारने लक्ष द्यायला हवे. तरच लोक जगतील. नाहीतर येत्या काळात लोक उपासमारीने मरतील. लॉकडाऊन पुन्हा वाढवू नका”, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती. ट्विटरच्या माध्यमातून आधी मुख्यमंत्री आणि त्यानंतर भाजपवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा, प्रवाशांची विभागणी होणार – विजय वडेट्टीवार

News Desk

राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

News Desk

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट देणार। उद्धव ठाकरे

News Desk