HW News Marathi
महाराष्ट्र

“फडणवीसांनी वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं”, प्रकाश आंबेडकरांनी डिवचलं

अकोला | गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहे. पण त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्याचंही चित्र निर्माण झालं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कोरोनाच्या प्रादुर्भावानं उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं

विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी केंद्रातल्या मोदी सरकारवरही निशाणा साधलाय. दुसऱ्या लाटेचं अपयश हे फक्त मोदींचा ममतांना पराभूत करण्याच्या अट्टहासामुळे असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त इव्हेंटमध्ये रस असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी केंद्राच्या लस महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लगावलाय. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं. त्यांनी नागपुरात चार-पाच कोविड सेंटर उभारावेत, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधी यांना पत्र

सोनिया गांधींना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, अगदी 13 मे रोजीच्या आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण कोरोना रूग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे 22 टक्के आहे, जे सातत्याने 30 टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 31 टक्के, तर सक्रिय रूग्णांचे सुद्धा 14 टक्के आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल, याच्याशी आपण सहमत असालच.

आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहे, ज्यात 1.80 कोटी वॅक्सिन्स, 8 लाखांहून अधिक रेमडेसिवीर, 1750 मेट्रीक टन ऑक्सिजन, कितीतरी वेंटिलेटर्स, बायपॅप आणि ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर्सचा समावेश आहे. असे असले तरी काही लोकांना मोदींवर टीका करणे, हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य वाटते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघडीमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?, नरेंद्र पाटलांचा खरमरीत सवाल

News Desk

‘मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ’ राऊतांचे सुचक ट्विट

News Desk

पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

News Desk