HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या लसीकरणावरून प्रकाश जावडेकरांनी दिला महाराष्ट्र सरकारला ‘डोस’

नवी दिल्ली | देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी एक ट्विट केलं आहे. ‘केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रानं केवळ २३ लाख लसीच्या डोसांचाच वापर केला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लसीचा वापरच झालेला नाही’ असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. यानंतरही, शिवसेनेचे खासदार संसदेत राज्यासाठी अतिरिक्त लशीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात ‘गैरव्यवस्था’ आणि आता लसीकरणादरम्यान ‘चुकीच्या प्रशासकीय हाताळणी’ दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे, आज (१७ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणासंबंधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्या आधीच अगोदर प्रकाश जावडेकर यांनी हे ट्विट केलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, २४ तासांत आढळले ३ लाखांच्या पुढे रुग्ण

News Desk

मनसेचा दणका, कोरोनाबाधितांकडून ज्यादा आकारलेले ३२ लाख हॉस्पिटलकडून परत

News Desk

#SushantSinghRajput Case | बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली CBI चौकशीची शिफारस

News Desk