HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्य हम चलायेंगे आणि मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही –  प्रसाद लाड 

रत्नागिरी | कोरोना संकटाशी इतके महिने लढल्यानंतर अखेर कोरोनावरील लस आली आणि लोकांचा जीव भांड्यात पडला. लवकरच देशात, राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल. पण या लसीकरणाच्या आधीच सरकारने सगळ्यांना लस मोफत द्यावी अशी मागणी विरोध पक्ष असलेल्या भाजपकडून केली जात आहे. कोरोना लसीच्या वितरणाचा खर्च केंद्र सरकारने करावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

या सरकारनं लसीच्या वितरणाचा खर्च केंद्राने करण्याची मागणी करण्यापेक्षा राज्यातील आघाडी सरकारच केंद्रात उचलून ठेवावं, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे. ते म्हणाले की, “राज्य हम चलायेंगे आणि मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही. आघाडी सरकारचं सध्या असंच काही सुरु आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन चंद्रकांत पाटलांविरोधात लढले तरी चंद्रकांतदादांना पाडणं अशक्य आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढल्याने काहीच फायदा होणार नाही. मग त्या मनपा निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो. कोल्हापुरातील चंद्रकांत पाटलांची ताकद काय आहे हे त्यांना कळेलच, असंही लाड यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या संकटात नागरिकांना शहरातील अद्ययावत रुग्णालये देतील दिलासा! । दादाजी भुसे

News Desk

ठाकरे सरकारची नियतच खोटी, भाजपकडून वीज बिलाच्या रद्दीवरुन सरकारवर टीका 

News Desk

उत्पल पर्रिकरांना तिकीट दिलं तर..; चंद्रकांत पाटलांचं राऊतांना चॅलेंज

News Desk