HW News Marathi
देश / विदेश

राजकारण नव्हे राजकीय नेते चंचल असतात ! दरेकरांचा राऊतांना टोला

मुंबई । “राजकारण चंचल असतं, कधीही काहीही घडू शकतं”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. लगेचच राऊत यांच्या या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आली आहे. राऊतांचा त्या विधावर प्रवीण दरेकर शिवसेनेला डीवचताना म्हणाले की, “राजकारण हे कधीच चंचल नसतं. राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही अशीच चंचल झाली आहे.”ते आज (१३ जून) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, “राजकारण हे चंचल असतं. या चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते.” त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले की, “संजय राऊत म्हणतात तसं राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते. राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेबाबत घडणारी ही गोष्ट आहे. संजय राऊत यांनी त्याचा विचार करावा.”

पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाविषयी बोलताना सूचक इशारा देत प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेला ५ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा. मात्र, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएलपी बैठकीत १०० आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची केली मागणी

News Desk

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

swarit

सरसंघचालकांनी घेतली मिथुन चक्रवर्तींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk