HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जातोय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप  

नवी मुंबई | राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांआधीत फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकांपुर्वीच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची आज (९ जानेवारी) भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईत भाजप नगरसेवकांवर दहशत निर्माण केली जात असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे. त्यांच्या जुन्या केसेस उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केला जात असल्याचं दरेकर यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं.

शहरात भयाचं वातावरण आहे. येथील वातावरण गढूळ झालं आहे. नगरसेवक आणि नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी पावलं उचलवीत, असं सांगतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी पोलिसांना केलं. दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसात भाजपच्या पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत आणि दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६ जूनला शिवराज्याभिषेकापर्यंत भूमिका घ्या नाहीतर…रायगडावरून आंदोलन जाहीर होणार !

News Desk

सामाजिक न्याय विभागाच्या पद्ग्रहणाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडेंचे खास ट्विट

Aprna

बेरोजगारी शेतकर्‍यांच्या दुरवस्थेची चिंता, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Aprna