HW News Marathi
महाराष्ट्र

‘सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी होतेय’, दरेकरांचा आरोप

मुंबई | कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत, राज्य सरकारने आषाढी वारी या वर्षी देखील रद्द केली आहे. पायी वारीला परवानगी नाकारल्याने अनेक भाविक, वारकरी नाराज आहेत. या सगळ्या नियमांना न जुमानता पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी आज (३ जुलै) ताब्यात घेतलं आहे.

सरकारकडून वारकऱ्यांचा अपमान

बंडातात्या कराडकर यांच्या अटकेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात वादावादीला सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांनी कराडकरांच्या अटकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणामध्ये आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “हा महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. हे सरकार आता वारकऱ्यांनासुद्धा सोडत नाही. अशाप्रकारे राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे”.

दरेकरांनी केला बोचक प्रश्न

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “कोरोनाचा धोका कायम असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते, मात्र लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही?

बंड्यातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक

या सर्व नियमांना झुगारून पंढरपूरला पायी जात असलेल्या बंड्यातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. मात्र बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काय म्हणाले आचार्य तुषार भोसले?

दरम्यान, बंडातात्यांच्या अटकेनंतर मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे, असं म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला.

फडणवीसांनी निषेध दर्शवला

महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षामध्ये वादविवाद नेहमीच सुरूच असतात. नवीन वादाचं कारण म्हणजे

बंड्यातात्या कराडकर यांच्या अटकेचा आहे. बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केली आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान?, असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी सरकारला केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रूपाली चाकणकर अमृता फडणवीसांना म्हणाल्या ,सर्कस की शेरनी !

News Desk

CA परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, आता नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा

News Desk

‘शट अप या कुणाल’च्या दुसऱ्या सिझनला शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुलाखतीने होणार सुरुवात

News Desk