HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार आणि मोदींमध्ये राजकीय चर्चा तर होणारच!, ‘त्या’ भेटीवर दरेकरांची प्रतिक्रिया

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज (१७ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या भेटीमागचे गुपित सांगितले आहे. नागरी आणि सहकारी बँकांवर रिझर्व बँकेने आणलेल्या निर्बंधांच्या बाबत ही भेट झाल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत असं म्हटलं की पवार मोदींच्या भेटीबाबत अफवा पसरवली जात आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या भेटीवर भाष्य केले आहे. एका वाहिनीशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, ‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते मोदींना भेटणे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्रातील तीन पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. त्यामुळे पवार व्यथितही असतील. महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असे त्यांना वाटले असेल.’ ‘राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणे हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच’, असा दावा त्यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात कागदी व प्लास्टिक ध्वजांचा वापर टाळावा! – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी

Aprna

‘बहाणेबाजी बंद करा, तुम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

News Desk

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा…!

Aprna