HW News Marathi
महाराष्ट्र

तृप्ती देसाईंना हवे शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्षपद !

नगर |“सरकारने शनी शिंगणापूर देवस्थान हे तात्काळ ताब्यात घेऊन मुख्यमंत्र्यांनी भूमाता ब्रिगेडला अध्यक्षपद द्यावे आणि महिलेला अध्यक्ष करण्याची परंपरा चालू ठेवावी अन्यथा राज्यात मोठे आंदोलन करू”, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी शनी शिंगणापूर येथे बोलताना सांगितले.

तृप्ती देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत 4 सप्टेंबरला (मंगळवारी) दुपारी २ च्या सुमारास शनी शिंगणापूरात शनी चौथऱ्यावरून दर्शन घेतले. “संपूर्ण राज्यातील मंदिरात दर्शनासाठी समानता असावी याकरिता आम्ही मोठे आंदोलन केले होते. आमच्या आंदोलनामुळे देशातील महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा हक्क मिळाला. तसेच राज्यातील अनेक मंदिरातील विविध प्रश्नांसाठी आमची संघटना लढत आहे. मंदिरात महिला पुजारी नेमावे यासाठीही आमचा लढा चालू आहे”, असे तृप्ती देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

नव्या विश्वस्त मंडळात सामाजिक कार्यकर्त्यांना स्थान द्या

शनी शिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेऊन सुमारे २ महिने झाले तरीही अजून जुनेच विश्वस्त मंडळ काम पाहत आहे. सरकार नवीन विश्वस्त मंडळ का निवडत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणे नवीन विश्वस्त मंडळात सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांना स्थान द्यावे. जर राजकीय लोकांना विश्वस्त मंडळात स्थान दिले गेले तर भूमाता ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तृप्ती देसाई यांनी यावेळी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बदलत्या परिस्थितीस सामोरी जाणारी आरोग्य व्यवस्था निर्मितीस प्राधान्य द्यावे! – आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे

Aprna

भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू

News Desk

राज्यात पुन्हा कडक निर्बंध; विवाह सोहळा ५०, तर अंत्यसंस्काराला २० लोकांना परवानगी

Aprna
राजकारण

रामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या, धर्मगुरुंचा योगींना सल्ला

News Desk

नवी दिल्ली | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाची २२१ फूट उंचीची मूर्ती उभारणार असल्याची घोषणा केली होती. मात्र योगींच्या या मूर्ती उभारण्याच्या संकल्पनेला धर्म संसदेतील साधू-संतांनी विरोध केला आहे. “श्रीरामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या. त्यासाठी प्रयत्न करा आणि हे करत असताना कुठलाही जातीयवाद करु नका”, असा सल्ला योगींना देण्यात आला आहे.

“आधीच देशभरात महापुरुषांचे भरपुर पुतळे आहेत. पुतळे महापुरुषांचे उभारले जातात देवाचे नाही. श्रीराम हे आपले दैवत आहेत. त्यामुळे श्रीरामाचे मंदिर उभारा पुतळा नाही”, असा सल्ला देखील सर्व संतानी योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी २२१ फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीसाठी शरयु नदीच्या किनाऱ्यावरील जागाही निश्चित केली होती. महाराष्ट्रातील मुर्तीकार राम सुतार यांनी बनविलेल्या मुर्तीची प्रतिकृतीची निवड त्यासाठी करण्यात आली आहे.

वाराणसी येथे २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवसांत परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास १००८ संत-महंतांनी सहभाग घेतला. सध्याची हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार याबाबत या संसदेत चर्चा करण्यात आली. सोबतच राम मंदिर, गंगा नदीचे शुद्धीकरण आणि सनातन धर्म यांसारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. याच चर्चेदरम्यान श्रीरामांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याला संसदेतील संतानी विरोध केला.

Related posts

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहणार !

News Desk

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यावर भडकल्या ममता दीदी

News Desk

शेगावत होणाऱ्या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार; उद्धव ठाकरे हजेरी लावणार?

Aprna