HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात सत्त स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल | सुधीर मुनगंटीवार

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आठवडा उलडला असला तरी सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्यास विलंब होणार असल्याचे चित्र दिसून येते आहे. भाजपने शिवसेनेवर दबाव तंत्र वापरण्यास सुरुवात झाला आहे. “७ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल,” असे सूचक विधान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव टाकत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दिवाळीमुळे सत्तास्थापनेच्या चर्चेला उशीर झाल्याचे देखील मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच येत्या एक-दोन दिवसात चर्चेला सुरुवात होईल, असे मुनगंटीवार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

पाच वर्षांपूर्वी ३१ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबै बँकेप्रकरणी आरोप केल्यामुळे दरेकरांनी ‘या’ काँग्रेसच्या नेत्यांना पाठवली नोटीस

Aprna

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

Gauri Tilekar

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna