HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट ? भाजपकडून विशेष प्रयत्न

मुंबई | भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक बातमी ट्विट केली आहे. ‘The Corona Crisis: President’s Rule, the only way out in Maharashtra?’ असे या बातमीचे शीर्षक आहे. तर पुढे यावर आपले मत मांडताना सुब्रमण्यम स्वामी यांनी असे म्हटले आहे कि, “आताच योग्य वेळ आहे पुढे तशी वेळ येणार नाही. उद्धव ठाकरे आताच महाविकासआघाडी तोडा नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला उध्वस्त करून टाकतील.” दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांच्या ‘या’ ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपच्या केंद्रातील नेत्याने महाराष्ट्रातील राजकारणाबाबत उघडपणे मत व्यक्त केल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील भाजपचे नेते आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून वारंवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली जात आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी महाराष्ट्र भाजपसह आता केंद्रही विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याची चिंताजनक स्थिती ! नव्या कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट २३ हजारांच्या पार

News Desk

राज्यावर चक्रीवादळाचे सावट, पंतप्रधानांकडून संपूर्ण मदतीचे आश्वासन

News Desk

देशात २४ तासांत ४९,३१० रुग्ण आढळले, तर ७४० जणांचा झाला मृत्यू

News Desk