HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी वाढतानाचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रतात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली असून राज्यपालांनी गृहमंत्र्यालयाडे पाठविलेल्या फाईलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून स्वाक्षरीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सहा महिन्यासाठी राज्या राष्ट्रपती राजवट लागू करण्या आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आज (१२ नोव्हेंबर) १२ वाजता सत्ता स्थपान करण्यासाठी बहुमत नसल्याचे पत्र राजभवनकाडे पाठविले होते. यात बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसाची मुदत मागितल्याचे पत्र राष्ट्रवादीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पाठविले होते. या पत्राच्या अनुषगांने राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला शिफारस केली. राज्यपालांच्या शिफारशीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी काल (११ नोव्हेंबर) निमंत्रण दिले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला २४ तासात सत्ता स्थापनेचा वेळोमर्यादा दिली होती. या मर्यादेनुसार तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेचा दाव करून शकले नाही. तसेच राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला २ दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र, भाजप सत्ता स्थापन करण्यास अपयश ठरल्यानंतर राज्यपालांनी शिवसेना दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु शिवसेनाल सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी अवघे २४ तासांचा कालावधी दिला होता. यात शिवसेना अपयशी ठरली होती. मात्र, शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होता. मात्र, राज्यापालांनी वेळ वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा! – उपमुख्यमंत्री

Aprna

राज्यात १ लाख ९७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप, तर ७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

News Desk

 ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडली आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे’, मनसेचा मुख्यमंत्र्यावर घणाघात

News Desk