HW News Marathi
महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भाजपा नागरसेवकाकडून पूरग्रस्तांना मानधन जाहीर!

पुणे। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थती निर्माण झाली होती. अनेक लोकांचे प्राण या पुरात गेले आणि कित्येंकांची घरं उध्वस्त झाली आहेत. अशा नुकसानग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहीती महापौर उषा ढोरे यांनी दिली आहे.

गृह मंत्रालयाने ७०० कोटीं मंजूर

राज्य सरकार आणि केंद्रीय सरकारने पुरात नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदतीचा हाथ पुढे केला आहे. “आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, ” असे तोमर म्हणाले आहेत.

उपचाराचा खर्च सरकारकडून

पुरात ज्यांनी आपला जीव गमावला, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ५ लाखांची मदत करणार आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. राज्यात दिवसभर दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळांचा आढावा घेतला आहे. बचाव कार्य सुरु झालं असून लोकांची सुटका करण्यात येत आहे.

पंतप्रधानांकडून मदत जाहीर

कोकणात अतिवृष्टीच्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नेते पीडितांना मदत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांचा राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत २ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. कोकणात ३ दिवस जोरदार पाऊस सुरु आहे, ज्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचं मानधन पुरग्रस्तांना देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तिथली पाहणी करून त्यांनी लोकांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. राज्यात 9 जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा थोडा भाग बाधित झाला आहे. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

प्रत्येकाला मदत केली जाणार

सांगलीत पहिल्यांदा इतका जोरदार पाऊस पडला आहे. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या मागण्या ऐकुन घेतल्या आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचं काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही. दोन दिवसांत पूरस्थितीचं चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मिळून आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या ‘या’ भूमिकेमुळे पालिका निवडणुकीसाठी भाजप सतर्क

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण अनुयायांसाठी केले जाणार – धनंजय मुंडे

News Desk

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडतायत, गुगलीचीही गरज नाही !

News Desk