HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाईचे सावट

पुणे | राज्यात यंदाच्या वर्षी सरासरी ७८ टक्के पाऊस पडला आहे. पाऊस कमी पडल्यामुळे यंदा राज्यातील २०० हून अधिक तालुक्यांत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. औरंगाबाद विभागात एकूण २८ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के तर २१ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे. विभागात पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

यावर्षी ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १४३ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के तर १२१ तालुक्यांत ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. लातूर विभागात ४८ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात २५ ते ५० टक्के २६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.वेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्य सरकारने आपल्या कार्यकक्षेत दुष्काळ शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी परिपत्रक काढावे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. राज्याच्या कृषी विभागाने पीक पाण्यासंदर्भात तयार केलेल्या अहवालात टंचाईसदृश परिस्थितीचे अनुमान काढले आहे.

तालुक्यातील पावसाची स्थिती

विभाग तालुके २५ ते ५० ५० ते ७५ ७५ ते १०० १०० पेक्षा जास्त

कोकण ४७ — ०३ २५ १९ तालुके

नाशिक ४० ०५ २२ ११ ०२

पुणे ३९ १३ १६ ०४ ०६

कोल्हापूर ३३ ०१ ०९ १२ ११

औरंगाबाद २८ ०५ २१ ०२ —

लातूर ४८ ०३ २६ १३ ०६

अमरावती ५६ ०१ २४ २४ ०७

नागपूर ६४ — २२ ३० १२

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका पोलिसामुळे सरकारला फरक पडत नाही ! पवारांनी काढली भाजपची हवा

News Desk

“निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता तरी…”, फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी!

News Desk

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध !

News Desk