HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण, वाद पेटला !

मुंबई | नारायण राणे यांनी सकाळी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्रा शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला.

नेमकं काय घडलं

दुपारी नारायण राणे यांनी स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला, असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं! या प्रकरणानंतर आता भाजप आणि शिवसेनेतील वाद अधिक पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसैनिकांकडून स्मृतीस्थळांचं शुद्धीकरण

शिवसैनिकांनी स्मृतीस्थळांचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्यात शुद्धीकरणाची गरज असल्याचा खोचक टोला लगावला आहे. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

अतुल भातखळकरांची टिका

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. ‘शिवसेनाप्रमुखांना राहुल गांधी आदरांजली वाहत नाहीत, तरी त्यांच्या मांडीवर बसता. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या लखोबाच्या गळ्यात गळे घालता. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर ज्यांचा उद्धार केला त्या सोनिया मातोश्रींना मुजरे करता… उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करण्याची गरज आहे’, असं ट्वीट करत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Gauri Tilekar

भाजपमधून आऊटगोईंग सुरु,२०० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk

आदित्य ठाकरे ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार ?

News Desk