HW News Marathi
महाराष्ट्र

“शिव पंख” लावून द्या, कामावर तरी जाता येईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मनसेची खोचक टीका!

मुंबई। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आपल्याला दिसतात, आताही त्यांनी ट्विट करत अशीच एक टिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलीये, सर्व जणांच्या पाठीवर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असताना मुंबईच्या लोकल प्रवासाची मागणी सातत्याने पुढे येत होती, मात्र अजूनही तशी मुभा देण्यात आलेली नाही म्हणून संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

“सीएम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत, बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करु शकता, आमचा सीएम जगात भारी” असे खोचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

नाहीतर मनसेला रेलभरो करावं लागेल

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसेला रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं.

राज्य सरकारची भूमिका

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 22 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असणार आहेत. हे 22 जिल्हे कोणते आहेत, त्यात कोणत्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय? तर कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे निर्बंध कायम राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : राज्यात महायुतीला अभूतपूर्व विजय मिळणार !

News Desk

मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा ‘पेच’ पडला आहे हे नक्की!

News Desk

पंडित बिरजू महाराज निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली

News Desk