HW News Marathi
देश / विदेश

संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! गृहमंत्र्यांनी तातडीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सध्या भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन सध्या राजकारण चांगलेच पेटले आहे. अशातच संभाजीराजे यांनी आज (३१ जून) काहीच वेळापूर्वी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. “सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमकी उद्देश माहित नाही”, असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे. दरम्यान, संभाजीराजेंच्या या ट्विटची ठाकरे सरकारने तातडीने दखल घेतली असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिली आहे. त्यानंतर, संभाजीराजेंनी पुन्हा एक ट्विट करत “गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर आपण समाधानी असून हा विषय संपला”, असेही जाहीर केले आहे.

संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! दिलीप वळसे पाटील

संभाजीराजेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, “छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता.यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे”, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

मी समाधानी, हा विषय संपला ! संभाजीराजे

गृहमंत्र्यांच्या ट्विटनंतर पुन्हा ट्विट करून संभाजीराजेंनी म्हटले आहे कि, “आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीचे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला आहे”, असे म्हणत संभाजीराजेंनी या मुद्द्यावर पडदा टाकला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार जुंपत आहे. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे महाराष्ट्र दौऱ्यासह मुख्यमंत्र्यांपासून राज्यातील सर्व पक्षीय अध्यक्ष आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ६ जूनपर्यंतची वेळ देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. तर आता संभाजीराजे यांनी हे ट्विट करून खळबळ उडवून दिली होता. “सरकार माझ्यावर पाळत ठेवत असून त्यामागचे कारण मात्र मला माहिती नाही” असा गंभीर आरोप संभाजीराजेंनी केला होता.

काय आहे संभाजीराजेंच्या पहिले ट्विट?

सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमकी उद्देश माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रमाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करुन काय साध्य होणार आहे?, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे. नेमकं ते कोणत्या हेरगिरीबद्दल बोलत आहे याचा संभ्रम खऱ्या अर्थाने झाला आहे. यावर आता महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांकडून, मंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आयईडी स्फोट २ जवान शहीद

News Desk

दहशतवादावर चर्चा करण्यास आम्ही तयार | इम्रान खान

News Desk

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

News Desk