HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत पहाटे पावसाने लावली हजेरी

मुंबई | उन्हाळा आणि कोरोनामुळे बेजार झाल्यानंतर पावसाच्या सरी जेव्हा अंगावर पडतात तेव्हा मन अगदी शांत होते आणि सुखावते. गेल्या २-३ दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाच्या धारा लोकांची मने शांत करत आहेत. आज ( ६ जून) पहाटे मुंबईत देखील पावसाने हजेरी लावली.

मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पवई, घाटकोपर, वांद्रे, चेंबूर, लालबाग, सायन, दादर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी हे भाग पावसाने न्हाऊन निघाले.महाष्ट्राला तडाखा देणारे निसर्ग चक्रीवादळ आता शांत झाले आहे. पण या वादळामुळे मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. उकाडा, गर्मीमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला अलिबाग, मुरुड या भागामध्ये धडकले. हे वादळ धडकण्याच्या एकदिवस आधीपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. आणि आता या पावसामुळे मुंबईकरांची मने काही काळ का होईना पण शांत होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सोमय्याजी, मी आधीच पोहोचलोय…तुमचंही स्वागत”; नांदेडमध्ये काँग्रेसकडून भाजपला थेट आव्हान?

News Desk

मुंबईच्या लोकांनी गावी येऊ नये, नीतेश राणेंचा मुंबईकरांना सल्ला

swarit

आजपासून कोल्हापूर-मुंबई विमान सेवा सुरू

Aprna