HW News Marathi
महाराष्ट्र

“अण्णा हजारे इतके दिवस होते कुठे?” राज ठाकरेंचा सवाल

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं अजूनही सुरु करण्यास मनाई आहे. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर विरोधक टीका करत आहे. राज्यात काल(३० ऑगस्ट) भाजप नेत्यांकडून देवळा बाहेर आंदोलन करण्यात आलं होतं. या मुद्यात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारलं असता इतके दिवस अण्णा होते कुठे असा उपरोधिक प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का?

राज ठाकरे यांनी सरकारवर निर्बंधांवरून हल्ला चढवला आहे. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात, अशी टीका राज यांनी केली आहे.

मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का?

राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधांवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. जनआशीर्वाद यात्रा झाली, त्यानंतर निदर्शने झाली. नुकताच भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केल्याचा व्हीडिओ मी पाहिला. मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

स्टुलावर उभं राहून फोडायची का?

राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले आहेत.

राज्य सरकारने दहीहंडी साजरा करू नये असं सरकारने बजावलं आहे, परंतु मनसे कार्यकर्त्यांनी हे नियम झुगारून हंड्या फोल्डया आहेत. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलबाजी केली. जसे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते मोजत नाहीत, तसेच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही, म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दुष्काळ आवडे सर्वांना

गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट आणली जात आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे सणांवरच बंधन का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असं ते म्हणाले आहेत.

लाट यायला हा काय समुद्र आहे का?

राज ठाकरे यांनी निवडणुकांवरूनही राज्यसरकारला टोला लगावला आहे. लाट यायला हा काय समुद्र आहे का? काही जाणवतं का तुम्हाला? उगाच इमारती सील करायच्या. अमेरिकेचं अमेरिका बघेल. तुमच्याकडे नाही ना. आता सर्वांना बंदी करून ठेवायचं आणिहे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फसव्या बाळूमामाला अटक!

News Desk

तर ऑफलाईन पद्धतीनेही लस द्या, राजेश टोपेंच्या सूचना!

News Desk

दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न – सतेज पाटील

News Desk