HW News Marathi
महाराष्ट्र

‘फडणवीस’ आडनाव कुठून आलं?, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत झालेल्या भेटींमधील किस्स्यांना उजाळा दिला. यावेळी राज यांनी थेट ‘फडणवीस’ हे आडनाव कुठून आलं? हे आडनाव कसं पडलं? याचा इतिहासच ऐकवला आहे. आज (२९ जुलै) पुण्यात ते बोलत होते.

राज ठाकरेंनी सांगितला फडणवीस आडनावाचा किस्सा

आपल्याकडे अनेक शब्द आहेत ते फारसी आहेत. पण ते आपल्याला माहीत नाहीत. अनेक आडनावं कशावरून आली हे माहीत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर हे ‘फडणवीस’ हे मुळात आडनाव नाही. ते मूळचं पर्शियन नाव आहे ‘फर्द नलीस’. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. म्हणजे ‘फर्द नलीस’. नंतर ते फडावर लिहिणं आलं. म्हणून ते फडणवीस आलं, असं राज यांनी सांगितलं आहे. आडनावं कशी असतात? आडनाव कशी पडली? ती कुठून आली? यात मला रस आहे. हे कुठून आले? कसे आले? महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कुठून आले? कसे आले? चपाती, पोळी कुठून आले? महाराष्ट्रात गहू नव्हता. मग गहू आला कुठून? अशा अनेक गोष्टी असतात त्या भूगोल आणि इतिहासाशी संबंधित असतात. बाबासाहेब या विषयावर माझ्याशी बोलले त्याबद्दल मी मला भाग्यवंत समजतो, असंही ते म्हणाले.

तेव्हाचे शब्द आता घ्यावेत का?

‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ हे शब्द म्हणजे तेव्हाची मराठी आहे. शब्द तेच आहेत. फक्त त्यात ळ किंवा ल मधला फरक आहे. ‘कैसी’ हा शब्द तिथे लिहिला ‘कैची’. तो तेव्हाचा मराठी शब्द आहे. तो आता घ्यावा का? आताच्या मराठीप्रमाणे ‘कैसी’ त्या संदर्भात लिहावा, याबाबत बाबासाहेबांशी मागच्या भेटीत बोललो होतो, असं राज यांनी स्पष्ट केलं.

हिंदुंनी कसं वागावं हेच बाबासाहेब सांगतात

परवा त्यांना भेटलो. ते म्हणाले, आनंदी आहे. पण समाधानी नाही. ते खरंच आहे. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटलो, त्या त्यावेळी नवीन खजाना भेटल्याचं मला प्रत्येकवेळी वाटलं. आपल्या छत्रपतींबद्दल अजून नवीन माहिती, इतिहासाबद्दल आणखी काही नवं बाबासाहेबांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. मी लहानपणापासून त्यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत. शिवछत्रपतींचं चरित्रं अनेकदा वाचून झालं आहे. मी ज्या ज्यावेळी त्यांचं व्याख्यान ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटतं ते नुसतं शिवचरित्रं सांगत नाहीत. 2021मध्ये आपण कसं जगलं पाहिजे. कसं सावध असलं पाहिजे, म्हणजे या देशातील हिंदुंनी मराठी समाजाने किती सावध असलं पाहिजे, किती सतर्क असलं पाहिजे हे या इतिहासातून मला वाटतं बाबासाहेब सतत सांगण्याचा प्रयत्न सर्वांना करत आले. त्यातून तो बोध घेणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुडत्या जहाजाचे ‘कप्तान’ कोण होईल! – चंद्रकांत पाटील

Aprna

ठाकरे सरकारच्या खातेवाटपाची अधिकृत यादी जाहीर

News Desk

लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन!

News Desk