HW News Marathi
महाराष्ट्र

“मै हुं ना…राज ठाकरेंचा अविनाश जाधवांना स्पेशल निरोप !

मुंबई | मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कोरोना काळात ठाण्यात अनेक रुग्णालयांविरुध्द आंदोलने केली. या सर्व बाबींमुळे त्यांना तडीपार करत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर मनसेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काल(२ ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नांदगावकर यांच्याजवळ अविनाथ जाधव यांच्यासाठी खास निरोप पाठवला आहे.
अविनाशला अटक झाली व तडीपारची नोटीस देण्यात आली. त्या अनुषंगाने राजसाहेबांकडे गेलो. तिथे अविनाश विषयी सखोल चर्चा झाली व साहेबांच्या निर्देशानुसार त्यांचा निरोप घेऊन ठाणे गाठले, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. मैं हूँ ना…. चिंता करू नकोस, असा स्पेशल निरोप राज यांनी दिल्याचे नांदगावकरांनी सांगितले आहे.
राजकारणात विविध पक्ष असतात पण मनसे परिवार आहे, आणि परिवारात कोणी अडचणीत असल्यास सर्व परिवारच ठामपणे त्याच्या मागे आपली पूर्ण ताकद लावून उभा असतो आणि आमचे परिवार प्रमुख राजसाहेब हे सर्व कार्यकर्त्यांवर अक्षरशः जिवापाड प्रेम करतात अन त्यांना जपतात. अविनाशबद्दल तर ही तळमळ अजून तीव्रतेने मी स्वतः आज अनुभवली. तेथून निघतांना बाकीच्या चर्चेबरोबरच साहेबांनी एकच निरोप अविनाशला दयायला सांगितला, अविनाश, मै हू ना! यात सगळेच आले, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली.
ठाण्याला जाऊन अविनाशशी भेट झाली. त्याला ठामपणे आम्ही सर्व सोबत आहोत व साहेबांचा विशेष संदेश सांगितला. राजसाहेबांच्या तीन शब्दांत किती ताकद आहे ना… कार्यकर्त्यांमध्ये याच तीन शब्दांनी १०० हत्तींचे बळ येते. अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा, असे स्पष्टपणे नांदगावकरांनी सरकारला सांगितले आहे.

https://www.facebook.com/132994656755891/posts/3134604463261547/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडतायत, गुगलीचीही गरज नाही !

News Desk

रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादीच्या महिलांनी पंतप्रधान आणि राज्यपालांना पाठवले पोस्टाद्वारे कांदे!

News Desk

मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत; त्यांच्यामध्ये वितुष्ट नको

News Desk