HW News Marathi
महाराष्ट्र

फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळेची राज ठाकरेंनी घेतली भेट!

मुंबई। ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर सोमवारी सायंकाळी फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. कल्पिता पिंपळे असं या महिला अधिकारीचे नाव असून या हल्लात त्यांची बोटे छाटली आहेत. कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया आली होती. आणि आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.

न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे

तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरिवाला म्हणून फिरता येणार नाही ना त्या दिवशी यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. निषेध करुन ही लोक सुधरणारी नाहीयेत. आम्ही हे वारंवार सांगत होतो. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटली जातात? आज पकडले गेलेत उद्या जामीन होईल आणि परत हे बाहेर दुसऱ्यांची बोट तोडायला.

यांची मस्ती उतरवली पाहिजे

राज ठाकरेंचा फेरीवाल्यांना इशारा

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला होता. “ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.” असं राज ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांची ‘मी जबाबदार’ घोषणा पण वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण?- सुधीर मुनगंटीवार

News Desk

खोकला आणि ताप आल्याने कोविड-19 चाचणी करून घेतली, मी निगेटिव्ह आहे

News Desk

महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा आहे – नारायण राणे 

News Desk