HW News Marathi
Covid-19

“…लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी”, लॉकडाऊनबाबात आरोग्यमंत्र्यांचे सुचक वक्तव्य

मुंबई | राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो का अशा चर्चा सुरु आहेत. अशात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन बाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज (३१ मार्च) शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर राजेश टोपे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी,’ असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. काल २७ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळं राज्य सरकार अधिक सतर्क झालं आहे. संपूर्ण लॉकडाऊन न करता करोनाचा संसर्ग कसा थोपवता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी कठोर निर्बंधांचा मार्ग अवलंबला जाणार आहे. राजेश टोपे यांनी आज तेच संकेत दिले. ‘गर्दी टाळणे हाच निर्बंध लावण्यामागचा मुख्य हेतू आहे. गर्दी कशी टाळता येईल. गर्दीच्या ठिकाणांवर कसे नियंत्रण ठेवता येईल होणारी जी काही ठिकाणं आहेत, याबाबतचं नियोजन केलं जात आहे. हे नियोजन अंतिम झाल्यावर त्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.

सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळलं जावं या दृष्टिकोनातून पावलं उचलावी लागणार आहेत. गरजेनुसार त्याबाबतचे आदेश निर्गमित केले जातात. यापूर्वी १५ मार्च आणि दोन दिवसांपूर्वी असे आदेश काढण्यात आले आहेत. करोना रुग्णांची संख्या अशीच राहणार असेल आणि लोक असेच बेफिकिरीनं वागणार असतील तर निर्बंधांमध्ये कठोरता आणावीच लागेल,’ असं टोपे म्हणाले. ‘लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळं ‘नियम पाळा, लॉकडाऊन टाळा’, असंही टोपे यांनी सांगितलं आहे.

“संख्या अशीच राहणार असेल आणि लोक बेफिक्रीने वागणार असतील तर निर्बंध अधिक कडक करणे यासंदर्भातील निर्णय घ्यावाच लागेल. नियम पाळा आणि लॉकडाउन टाळा एवढंच मला सांगायचं आहे,” असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ही जमावबंदी लावण्यात आली आहे. तसेच, राज्यात कोरोनाच्या लसीकरणालाही वेग आला आहे. त्यामुळे येत्या काळात लॉकडाऊनबाबात सरकार काय निर्णय घेणार हे पाहण महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात निर्बंध अंशत: शिथिल, दुकाने २ वाजेपर्यंत खुली

News Desk

राज्यात आज १६ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

माजी मंत्री सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन

News Desk