HW News Marathi
महाराष्ट्र

अविनाश जाधवांना मलंगगडावर आरती करण्यापूर्वीच केली अटक, तरीही २७ एप्रिलला आरतीचा निर्धार

उल्हासनगर | मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका जाधवांवर ठेवण्यात आला आहे. अविनाश जाधवांसह काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवलं आणि नेवाळी पोलीस चौकीत आणलं. यावेळी अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हिललाईन पोलिसांची कारवाई

उल्हासनगर परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अविनाश जाधव यांना नेवाळी पोलीस ठाण्यातून उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. अखेर हिललाईन पोलिसांनी अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली.

२७ एप्रिलला आरती करणारच!

मलंगगडावर जाऊन आरती करण्याच्या निर्णयावर अविनाश जाधव ठाम होते. त्यानंतर अविनाश जाधव यांच्यासोबत पोलिसांनी संवाद साधला. मात्र त्यानंतरदेखील २७ एप्रिलला मलंगगडावर जाऊन आरती करणाच्या निर्धार अविनाश जाधव यांनी फेसबुकद्वारे व्यक्त केला आहे. अटकेत असणाऱ्या अविनाश जाधव यांनी फेसबुकद्वारे २७ एप्रिलला मलंगगडावर जाऊन आरती करणार असल्याचा एल्गार जाहीर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ३१ जुलै २०२० ला अटक केली होती. ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसानंतर जामीन मंजूर केला होता.

अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया – संदीप देशपांडे

“अविनाश जाधव यांना (३१ जुलै) तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केले, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

“सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आले तेव्हा हे शिवशाहीचे सरकार असे म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचे नाही तर मोघलाईचे आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असेही देशपांडे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परिवहन विभागासाठी लगेच पैस दिले मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही? माजी उर्ज्यामंत्र्याचा सवाल

News Desk

“लज्जास्पद आहे कंगना राणावत”, उर्मिला- कंगना वादावर डॉ. माधुरी कानिटकर यांची प्रतिक्रिया

News Desk

BJP Vs ShivSena: राऊत आणि सोमय्यांच्यातील वाद शिगेला!

Manasi Devkar